Sharad Pawar gram samriddhi Yojana या योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हा मुख्य हेतू या योजनेमागे आहे. शेतकऱ्यांसाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणे महत्त्वाचे असते. पशुपालन व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाची गरज भासते ती गाई म्हशीच्या गोठ्याची किंवा शेळी पालन करत असेल तर शेळीपालनाच्या शेडची. या योजनेतून शेतकऱ्यांना गोठा आणि शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची जोडण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करू शकता.