शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना असणाऱ्या आर्थिक गरजेसाठी स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. त्यामुळे शेतमालाचे बाजार भाव कमी होतात. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य भाव मिळावा. या दृष्टिकोनातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते.